भाजपमध्ये कोणी आले किंवा कोणी गेले तरी पक्षाला फरक पडत नाही. पक्षाने माजी खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापले. ते गेले म्हणून भाजपला काही फरक पडला नाही, त्यामुळे आमच्यामुळे पक्ष आहे, असे समजणाऱ्यांनी आता ते विसरून जावे, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. तर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी, लोकसभेचा उमेदवार निवडून आणणे म्हणजे येथे बसलेल्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे यश नाही, असा टोला लगावला. दरम्यान, शनिवारी (दि. २९) भाजपच्या बैठकीत या दोघंही नेत्यांनी जोरदार शाब्दिक बॅटिंग करून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2RHwK1B
No comments:
Post a Comment