यंदाची भाऊबीज ऐन मंगळवारी आल्याने बहुतांश मुंबईकर बहिणींच्या घरात भाऊरायांसाठी आखलेली कोंबडी-वड्याची मेजवानी रद्द होऊन, श्रीखंड-पुरीला मानाचे स्थान मिळाल्याचे चित्र दिसून आले. मुंबईमध्ये तब्बल ९० हजार किलोहून अधिक श्रीखंडाची विक्री झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून केशर ड्रायफ्रूट, आम्रखंड, अंजीर अशा स्वादांना मुंबईकरांकडून सर्वाधिक पसंती मिळाल्याचे अनेक दुकानदारांनी सांगितले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2N0ZEcl
No comments:
Post a Comment