दिवाळी आली की घरोघरी साफसफाई करून रद्दी काढली जाते. ही रद्दी विकून मिळणारे पैसे गृहिणींसाठी हातखर्च किंवा लहानग्यांसाठी खाऊ, पॉकेटमनी म्हणून उपयोगात येतात. मात्र, यंदा जागतिक स्तरावर रद्दीचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी गडगडल्याने किरकोळ बाजारातही एक किलो रद्दीचे अवघे ६ ते ७ रुपये (यापूर्वीचा दर प्रति किलो १० ते १२ रुपये) मिळत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत सामान्य नागरिकांना विशेषतः गृहिणी आणि लहानग्यांना रद्दी विकून हातखर्चासाठी मिळणाऱ्या पैशांच्या आनंदाला मुकावे लागणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Pv3WdJ
No comments:
Post a Comment