आर्थिक मंदीचा फटका रेल्वेलाही बसला असून, चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत रेल्वेचे प्रवासी भाड्यातून मिळणारे उत्पन्न १५५ कोटी रुपयांनी घटले आहे. याच कालावधीमध्ये मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही ३,९०१ कोटी रुपयांनी घसरण झाली आहे. नैसर्गिक आपत्तींबरोबरच, पोलाद आणि सिमेंट उत्पादन कमी झाल्यामुळे, त्याचा परिणाम रेल्वेच्या महसुलावर झाला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Jpdfba
No comments:
Post a Comment