Friday, June 21, 2019

चार वर्षांत १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकऱ्यांना सुखी करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळातच सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. नापिकी, कर्जबाजारी, शेतीमालाला हमीभाव न मिळणे, दुष्काळ आदी कारणांमुळे सन २०१५ ते २०१८ या चार वर्षांमध्ये राज्यात १२ हजार २१ तर जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत ६१० अशा एकूण १२ हजार ६३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Y0HJ8I

No comments:

Post a Comment