टोल नाक्यावरील वाहनांच्या लांब रांगा टाळण्यासाठी व डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १ डिसेंबरपासून 'फास्टॅग' अनिवार्य केले होते. मात्र या मुदतीत अनेक वाहनमालकांना आपल्या वाहनांवर 'फास्टॅग' लावणे शक्य न झाल्याचे लक्षात घेत 'एनएचएआय'कडून १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या मुदतीनंतर विना'फास्टॅग' ईटीसी रांगेत प्रवेश केलात तर दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2rJNRXw
No comments:
Post a Comment