Friday, August 31, 2018

अॅट्रॉसिटीचे खटले निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यभरातील अॅट्रॉसिटीचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी राज्यात सहा ठिकाणी विशेष न्यायलयांची स्थापना केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.</p> <p style="text-align: justify;">सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विनोद तावडे आणि खासदार अमर साबळे उपस्थित होते.</p> <p style="text-align: justify;">ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नागपुरसह आता नाशिक आणि पुणे या 6 विभागात या विशेष न्यायालयांनी स्थापना केली जाणार आहे. पुणे आणि नाशिकमध्ये येत्या महिनाभरात ही न्यायालये कार्यान्वित होणार आहेत.</p> <p style="text-align: justify;">राज्यभरात 2014पासून जुलै 2018 पर्यंत अॅट्रॉसिटीचे एकूण 1341 खटले दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक- 212, कोल्हापूर- 302, औरंगाबाद- 154,कोकण- 106, नांदेड- 166, अमरावती- 203,  नागपूर- 182 खटल्यांचा समावेश आहे.</p>

from home https://ift.tt/2PRRSkm

No comments:

Post a Comment