पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आता नवा डाव टाकला आहे. 'लोकसभा निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास आम्ही पंतप्रधानपदही सोडायला तयार आहोत. आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी काहीच अडचण नाही,' असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं उद्दिष्टं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
from The Maharashtratimes http://bit.ly/30kXSY2
No comments:
Post a Comment