डिजिटल इंडियाचे स्वप्न रंगविले जात असतानाच आधार कार्ड लिंक न झाल्याने रेशनचे धान्य मिळाले नाही. धान्य नसल्याने उपासमार होऊन मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा गवई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी पंचफुला यांनी केला आहे. आठ दिवसानंतर समोर आलेल्या या घटनेने शनिवारी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, आधारसक्ती गरजेची नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच दिला होता. प्रशासनाने मात्र भूकबळीचा आरोप फेटाळून लावला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2xNxut7
No comments:
Post a Comment