'राष्ट्रवादी काँग्रेस हा संधीसाधू भांडवलदारांचा पक्ष असून, आता या पक्षातून निवडणूक जिंकता येणार नाही, असे ज्यांना वाटते ते भारतीय जनता पक्षाकडे चालले आहेत. काँग्रेसचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांचे अस्तित्व कमी होऊ लागले आहे. त्यातही ज्यांची चौकशी सुरू आहे, असे नेते भाजपकडे पळत आहेत. त्यामुळे भाजप हा चोरांचा पक्ष होतो आहे,' अशा खोचक शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीतील 'आउटगोइंग' आणि भाजपमधील 'इनकमिंग'वर बोट ठेवले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2PxQfMm
No comments:
Post a Comment