काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातही 'हाकामारी' नावाची एक गोष्ट यायची. ती रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून फिरायची. एखाद्या घराखाली जाऊन मुलांना हाक मारायची. त्या हाकेला ओ दिली, की ती त्या मुलाला आपल्याबरोबर घेऊन जायची. साधारण मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुटीमध्ये 'हाकामारी' आल्याची बातमी पसरायची. त्या काळात अंधारल्यानंतर शहर शांत होत असे, ते एकदम चिडीचुप होऊन जायचे. या 'हाकामारी'च्या जादूतून बचावण्यासाठी एक उपाय होता. आपल्या घराच्या दरवाजावर चुन्याने तीन मोठ्या फुल्या मारायच्या. अशा फुल्या असलेल्या दाराबाहेर ती 'हाकामारी' थांबायची नाही म्हणे. वर्षे उलटली, काळ बदलला आणि मुलांच्या मनातून ही 'हाकामारी' निघून गेली. आता दिवस-रात्र जागत्या शहरामध्ये तिचा मागमूसही लागत नाही. जुन्या वाड्यांच्या दरवाजांवर दिसणाऱ्या फुल्याच काय ती तिची आठवण करून देतात.
from The Maharashtratimes https://ift.tt/2ND2QIY
No comments:
Post a Comment