भारतीय हवाई दलाने १२ मिराज २००० या लढाऊ विमानांद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सू्त्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने हाय अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासूनच सीमेवर लढाऊ विमानांचा आवाज येत होता अशी माहिती सीमेवरील स्थानिक भारतीय नागरिकांनीही दिली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Ex2d1j
No comments:
Post a Comment