Saturday, August 3, 2019

राज्यात कोसळ'धार', अनेक जिल्ह्यांत पूर परिस्थिती

नाशिकसह राज्यभरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात या हंगामात पहिल्यांदाच तब्बल ११ धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून हा विसर्ग सुरू होता. यामुळे जायकवाडीत पाण्याचा ओघ वाढला आहे. सायखेड्यातील गंगानगर परिसरातील ४५, तर चांदोरीतील कोळीवाडा येथून २० कुटुंबे हलविण्यात आली, पेठ तालुक्यात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली, तर १२ घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन जण वाहून गेले, तर पनवेलमध्ये पांडवकडा परिसरात तीन तरुणी वाहून गेल्या. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, पुण्यात मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, तर तळकोकणात अनेक अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2GIS7eu

No comments:

Post a Comment